Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site
१) अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा विचार आहे 'ज्ञानापेक्षाही मनात पाहिली जाणारी कल्पनाचित्रे अधिक शक्तिमान असतात'. कोणतीही बहुमजली ईमारत साकारली जाण्यापूर्वी ब्ल्यू प्रिंट सर्वप्रथम मनात आकारबध्द होत असते. प्रसिध्द मानसशास्त्रज्ञ विलीपत्र जेम्स यांनी स्पष्ट केलंय की सहजपणे पाहिली जाणारी ही मानसचित्रेच आपल्या जीवनाला आकार देत असतात.
२) ज्या माणसाला अंतिम विजेता व्हायचं असतं तो मनातून कधीच अपयश स्वीकारत नाही. नेपोलियन हिल यांच्या 'यशस्वितेचे नियम' या संग्रहात एक उदबोधक विचार आहे. 'प्रत्येक आपत्ती,प्रत्येक अपयश तसेच प्रत्येक हृदयद्रावक घटना यांच्यामध्ये त्यांच्या बरोबरीचे अथवा त्याहून मोठे लाभ मिळवून देणारे बीज असते.' तुम्ही येणा-या अपयशांकडे कसे पाहता हे महत्वाचे आहे. लोक हसतील, आपली नाचक्की होईल म्हणून अपयशा्कडून दूर पळाल तर 'आपण जीवनात काहीच साध्य केले नाही' हे असमाधान शेवटपर्यंत राहील. येणा-या अपयशाकडे जर आपला मार्गदर्शक म्हणून पहाल तर त्याच अपयशाच्या पाय-या बनवून शिखरावर स्वार होत यशाचा मुकूट धारण कराल.
३) स्वामी विवेकानंद एका भाषणात म्हणाले होते की, माणसाकडे राईच्या दाण्याइतका जरी विश्वास असेल तर सागराला तुकविण्याचे तसेच पर्वताला हलविण्याचे सामर्थ्य त्याच्यात निर्माण होते. बर्नार्ड शा यांचा एक विचार कुणालाही नवप्रेरणा देऊ शकतो. 'काही लोकं एखादी गोष्ट पाहून सहज प्रश्न विचारतात 'असे का?,' तर मी हयात नसलेल्या एखाद्या गोष्टीचा विचार करत स्वतःलाच विचारतो'का शक्य नाही' मनासारखी गोष्ट जीवनात हवीच असेल तर 'शक्य आहे हा विश्वास महत्वाचा असतो.
मराठी-विश्व एक निशुल्क मुक्तांगन आहे. आपल्या सुचना, साहित्य या कम्युनिटीवर, मराठीविश्व@जीमेल.काँम वर किंवा थेट मराठी विश्व.कॉम लोग इन करून पोष्ट करू शकता.... आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा.